अभियानांतर्गत गावस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात-
अभियानांतर्गत गावस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला तसेच संलग्नित घटकांची क्षमतावृद्धी होण्यासाठी संसाधन व्यक्तींची निवड केली जाते. जिल्ह्यात खालील स्वरूपाच्या प्रमुख संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत. या संसाधन व्यक्तीचा उपयोग संस्थात्मक उभारणी, आर्थिक साक्षरता, कृषिविकास, पशुसंवर्धन आदी कामासाठी केला जातो.
-
- समूह संसाधन व्यक्ती (प्रेरिका)
गावपातळीवर स्वयंसहायता समुहाची स्थापना व बळकटीकरण अभियानाचे महत्वाचा टप्पा आहे. गावांत गट तयार करणे, जुने गट पुर्नजिवित करणे करणे तसेच गटाकडून दशसुत्रीचे पालन व्हावे, यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्याचे कार्य समुह संसाधन व्यक्ती करते. गटावर देखरेख ठेवण्याचे कार्य त्यांच्याकडून केले जाते. समुह संसाधन व्यक्ती या अभियान आणि स्वयंसहायता गटातील महत्वाचा दुवा आहे. समुह संसाधन व्यक्ती या ग्रामसंघासाठी उत्तरदायी असतात. त्यांनी केलेल्या कामाचा ग्रामसंघाकडून नियमितपणे आढावा घेतला जातो.
- वर्धिनी
जवळपास सर्वच इंटेन्सिव्ह जिल्ह्यांमध्ये सामाजिक समावेशनाचे आणि गरीब महिलांचे स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्याचे कार्य वर्धिनी करीत आहे. वर्धिनीचे कार्यही प्रेरिकांचे सारखे असले, तरी वर्धिनी या तालुका व जिल्हा सोडून बाह्य जिल्ह्यात गटबांधणीचे कार्य करतात. ज्या ठिकाणी अभियानाचे नव्याने काम सुरू झाले असेल, अशा ठिकाणी वर्धिनी १५ दिवशीय ङ्केरीचे आयोजन करुन अभियानाच्या धोरणानुसार सामाजिक समावेशन व गटबांधणीचे कार्य करतात. सर्वसाधारणपणे प्रेरिका आपल्या कामात पारंगत झाल्यानंतर त्यांची वर्धिनी म्हणून अभियानाकडून निवड केली जाते.
- बँकसखी
सामाजिक समावेशनातून गरिबांच्या संस्था स्थापन करुन त्यांचे वित्तीय समावेशन करुन त्यांना गरिबीच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे, हे अभियानाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे. बँक सखी ही स्वयंसहायता समुहातील महिलांना बँक संबंधित कामामध्ये योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्याचे कार्य करते. बँक सखी बॅक शाखेत स्वयंसहायता समुहासाठी माहिती कक्षाची भूमिका वठविते. विशेषकरून खाते काढणे, कर्ज प्रकरणे तयार करणे, आर्थिक साक्षरता निर्माण करणे, कर्ज परतफेडीचा आढावा घेणे स्वयंसहायता गट आणि बँक यंत्रणेत दुवा म्हणून बॅकसखी कार्य करते. जिल्ह्यातील प्रमुख बँक शाखेमध्ये बॅकसखी कार्यरत आहे.
- कृषीसखी
या स्वरूपाच्या संसाधन व्यक्ती या गावात कृषी उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करतात. गटात सक्रिय असलेल्या व कृषीचे ज्ञान असलेल्या महिलेची गट किंवा ग्रामसंघामार्फत निवड केली जाते. अभियानाकडून कृषी उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. विशेषकरून धान उत्पादन वाढ, भाजीपाला लागवड, कृषी व्यवस्थापन आदीबाबत कृषीसखी ग्रामसंघ तसेच गटांच्या बैठकांत जाऊन मार्गदर्शन करतात. आवश्यकतेनुसार कृषीसखीकडून लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जाते. अभियानामाङ्र्कत नेमलेल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून कृषीसखींना वेळोवेळी प्रशिक्षित केले जाते.
- पशूसखी
या स्वरूपाच्या संसाधन व्यक्ती या गावांत पशूसंवर्धनासाठी मदत करतात. ग्रामीण भागात अजूनही परंपरागतरित्या पशुपालन केले जाते. जिल्ह्यात परंपरागतरित्या शेळीपालन केले जाते. जोडव्यवसाय म्हणून अनेक कुटुंब हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय अधिक शास्त्रीय पद्धतीने व्हावा, पशूंचा मृत्यूदर नियत्रंणात असावा, चांगल्या दर्जाचे पशू निर्माण व्हावे, घरगुती संसाधनातून खाद्य तयार करण्याचे कौशल्य विकसित व्हावे, यासाठी पशूसखी कार्य करतात.
- मत्स्यसखी
या स्वरूपाच्या संसाधन व्यक्ती या मत्स्य उत्पादनवाढीसाठी कार्य करतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक बोडया तसेच मामा तलाव आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मत्स्यपालनास वाव आहे. कृषी, पशूपालनासोबतच मत्स्यव्यवसायाची जोड मिळाल्यास शेतकèयांचे उत्पादन वाढू शकते. मत्स्यसखी मत्स्यपालनासाठी प्रवृत्त करण्याचे महत्वाचे कार्य करतात. शास्त्रीय पद्धतीने मत्स्यपालन करण्याविषयी लाभार्थींना प्रशिक्षित करण्याचे कार्य मत्स्यसखीकडून केले जाते. बीजनिवड, हंगामपुर्ण तयारी, मत्स्यखादय, बाजारपेठ आदींविषयी मत्स्यसखीव्दारे मार्गदर्शन केले जाते. मत्स्यसखीला वेळोवेळी जिल्हास्तरीय तज्ज्ञ, मत्स्यविद्यापीठ यांच्याकडून प्रशिक्षित केले जाते.
ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यावर अभियानाचा भर आहे. त्यामुळे विविध योजनांची सांगड घालून स्वयंसहायता समुह तसेच त्यांच्या कुटुंबीयांतील गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळविण्याचे काम अभियानामार्फत पार पाडले जाते. यापैकी काही प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत
- राष्ट्रीय आर्थिक परिवर्तन प्रकल्प (NRETP-National Rural Economical Transformation Project)
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत संस्थीय बांधणी करण्यात आली असून, उपजिविका साधनांत वृदधी होण्यासाठी शेती व शेतीपुरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. हे कार्य अधिक गतीमान पदधतीने राबविता यावे व मुल्यवर्धन साखळी निर्माण व्हावी, बाजारपेठ उपलब्धता वाढावी यासाठी प्रकल्पात काम केले जाते. उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या, उदयोगांसाठी OSF स्थापन करण्याचे कार्य केले जाते.
- सुमतीबाई सुकळीकर उदयोगिनी महिला सक्षमीकरण योजना :
स्वयंसहायता गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठीची ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वंयसहायता गटाचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात सहभाग आवश्यक आहे. गटाची एनआरएलएमच्या संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक असून, बँक कर्जाच्या हप्त्याची नियमित परतफेड असणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेंत खातेदार असलेल्या गटांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- आर. सेटी
जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने जिल्हास्तरावर ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) चालविली जाते. उदयोजकता व कौशल्य विकासासाठी बॅकेव्दारे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यातंर्गत विनामुल्य निवासी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. स्थानिक गरज लक्षात घेऊन कमी कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय प्रशिक्षण घेतल्यानंतर बॅकेंकडून व्यवसायासाठी कर्ज मिळविण्यासाठी साहाय्य तसेच प्रशिक्षणानंतर व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील १७ ते ४५ वर्ष वयोगटातील युवक-युवती या योजनेचा लाभ घेऊ घेतात.
- दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजना
दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजनेतंर्गत युवक-युवतींना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून दिली जाते. सध्या मागणी असलेल्या विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचे यातंर्गत मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण १५ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींना दिले जाते. पात्रतेनुसार प्रशिक्षण दिले जाते तसेच सरकारी मान्यतेचे प्रमाणपत्र दिले जाते. संबंधित प्रशिक्षणार्थींना रोजगार प्राप्त करुन देणे तसेच त्यांच्या वेतनवृद्धीसाठीही योजनेत प्रयत्न केले जातात. प्रशिक्षणासाठी विभागपातळीवर विशेष प्रशिक्षणस्थळे उपलब्ध करून दिले जाते.